मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संभाजी शिंदे

मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा -संभाजी शिंदे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०३/२०२५- मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान भैय्याजी जोशी यांनी केले आहे.मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचे हे वक्तव्य राजद्रोहात बसते.१०६ हुतात्म्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी का ? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे जे सत्तेत बसले आहेत ते त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

आज पंढरपुर तहसील कार्यालयाच्या प्रवेश दारात शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन दिले.

यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी भैय्या जोशी यांच्यावर कारवाई करण्यास राज्य सरकार धजावत नसून भाषेवर आणि जाती जातीत तेढ निर्माण करून बटेंगे तो कटेंगे सारखे विधाने करणारे आज सत्तेत बसले आहेत.मात्र मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अवमान होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रमुख सिद्धेश्वर कोरे,तालुका प्रमुख बंडू घोडके,उपतालुका प्रमुख समाधान गोरे,विभाग प्रमुख दिलीप उघडे,महावीर हाळे,शाखा प्रमुख नामदेव चव्हाण,विभाग प्रमुख भारत कदम, युवासेना विभाग प्रमुख युवराज गणेश,गट प्रमुख नागनाथ देडगे,शाखा प्रमुख कल्याण कदम, नागनाथ देंडगे,नितीन थिटे,अमोल पवार, दत्तात्रय पाटील,सचिन खुटाळे,अजिंक्य गोसावी,महावीर हाके,मनोज कदम,विकी जाधव,उपतालुका संजय घोडके,समाधान गोरे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading