साताऱ्यामध्ये निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या तलाठीचा अपघातात मृत्यू

[ad_1]


Satara News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री अडीच वाजता दुचाकीवरून घरी जात असताना तरुण तलाठीचा भीषण अपघात झाला.   

 

मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाचवडजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून तलाठी रोहित अशोक कदम 28 वर्षे  यांचा मृत्यू झाला. या अपघातात रोहित कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात नेले, पण त्यांना वाचवता आले नाही. रोहितची दोन महिन्यांपूर्वी आलेवाडी येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी रोहित कदम हे 20 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या कामासाठी तैनात होते. साताऱ्यात दिवसभर मतदान प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर मतपेट्या जमा झाल्या. यानंतर रात्री दोनच्या दरम्यान ते साताऱ्याहून भुईंज या गावी निघाले. पण पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली. ही ट्रॉली महामार्गावर उभी होती आणि रिफ्लेक्टर नसल्याने रोहित कदम यांना ती दिसली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची दुचाकी मागून येणाऱ्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी भुईज पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डोक्यातून जास्त रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading