[ad_1]

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची पहिली तुकडी रविवारी रात्री ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. त्यासाठी टीम मुंबई विमानतळावरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. भारतीय संघ दोन टप्प्यात या दौऱ्यासाठी जाणार आहे. दुसरी तुकडी सोमवारी निघणार आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, आकाश दीप सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसह पहिल्या तुकडीसह रवाना झाले आहेत. हे सर्वजण रविवारी मुंबई विमानतळावर दिसले. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि सरफराज खान यांचाही पहिल्या तुकडीत समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी यशस्वी विमानतळावर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसला.
कर्णधार रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर साशंकता आहे . मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित सध्या या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही, त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही.
रोहित त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतातच राहणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रोहितने असेही सांगितले होते की, त्याच्या वेळापत्रकाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.
भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 असा विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडने अलीकडेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा एकतर्फी पराभव केला होता. न्यूझीलंड हा आपल्याच भूमीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला क्लीन स्वीप करणारा पहिला संघ ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
Edited By – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
