[ad_1]

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुग्रामच्या सरस्वती एन्क्लेव्हच्या जे ब्लॉकमधील एका घराला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली.
गुरुग्राममध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती एन्क्लेव्हच्या जे ब्लॉकमधील एका घराला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. पण आगीचे कारण अजून समोर आलेले नाही.
तसेच या अपघातात खोलीत झोपलेल्या 17 वर्षे, 22 वर्षे, 24 वर्षे आणि 28 वर्षे वयाच्या तरुणांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेली चार मुले बिहारमधील रहिवासी होती. येथे सर्वजण भाड्याच्या घरात राहत होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
