अखिलेश यादव महाराष्ट्रात म्हणाले- भाजपची अवस्था यूपीसारखी होईल

[ad_1]

akhilesh yadav
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. तसेच महाराष्ट्रात अखिलेश यादव म्हणाले की, सपा महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जिंकू शकणाऱ्या जागा मागितल्या आहे. आम्ही संपूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू 

 

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव शुक्रवारी राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे त्यांनी शुक्रवारी निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत सपाच्या काही उमेदवारांची नावेही जाहीर केली.

 

तसेच मुसळधार पावसामुळे सपाच्या मालेगाव सभेत अडचणी आल्या. यावेळी अखिलेश यादव आपल्या भाषणात म्हणाले, की, “जसे उत्तर प्रदेशने चमत्कार केले आहे. सर्वांनी मिळून भाजपशी लढा दिला आणि भाजपला असा पराभव दिला ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. यूपीप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही हे द्वेषाचे राजकारण संपवेल. तत्पूर्वी, सपा प्रमुख म्हणाले की, “जो पहिला येईल तो पुढे जाईल. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) कडून 12 जागांची सपाची मागणी अगदी योग्य आहे, समाजवादी पार्टी महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकेल. तसेच हरियाणाच्या निकालाचा संदर्भ देत सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, “पराभवानंतर प्रत्येक पक्षाची विचारसरणी बदलते. हरियाणात सर्व काही काँग्रेसच्या बाजूने होते, पण तिथेही भाजपने सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात अत्यंत सावध राहून निवडणूक लढवावी लागेल. असे देखील ते म्हणाले. 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading