[ad_1]

रतन टाटा यांच्या निधनानंतर भारत रत्नची मागणी वाढली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील शिंदे सरकारने एक महत्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. ज्यामध्ये केंद्राला विनंती करण्यात आली आहे की, प्रसिद्ध उदयोगपती रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान 'भारतरत्न' ने सन्मानित करण्यात यावे. त्यांचे योगदान आणि कामगिरी ओळखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रतन टाटा यांनी भारतीय उद्योगमध्ये जी भूमिका निभावली आहे. याकरिता ते या सन्मानासाठी पात्र मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज गृहमंत्री अमित शहा मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. तसेच या महान उद्योगपतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राज्याचा शोक जाहीर केला आहे.
रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCP लॉनमध्ये ठेवण्यात आले आहे.
रतन टाटा हे एक प्रख्यात उद्योगपती होते ज्यांनी टाटा समूहाला एका सामान्य कंपनीतून भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली समूहात रूपांतरित केले.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
