[ad_1]

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ‘जीवनपुत्रिका’ उत्सवादरम्यान दोन वेगवेगळ्या गावांतील तलावात आंघोळ करताना आठ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितीश यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना विलंब न करता प्रत्येकी 4 लाख रुपय अनुदानाची रक्कम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांना धीर देण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत शास्त्री म्हणाले की, “हे लोक त्यांच्या कुटुंबीयांसह ‘जीवितपुत्रिका’ उत्सवानिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी विविध तलावांमध्ये गेले असताना ही घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तातडीने तेथे पोहोचले आणि मुलांना तलावातून बाहेर काढले व त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
