[ad_1]

भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे, ज्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात अंतिम सामना रंगणार असून, त्यात भारतीय संघ विक्रमी पाचव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असेल.
दक्षिण कोरियाविरुद्ध भारताने पहिल्या क्वार्टरपासूनच आघाडी कायम ठेवली. प्रथम उत्तम सिंगने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने वर्चस्व राखत आघाडी दुप्पट केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी एक गोल केला. अशा प्रकारे भारताने पहिल्या हाफअखेर दक्षिण कोरियावर 2-0 अशी आघाडी घेतली होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल केले. हाफ टाईमनंतर दक्षिण कोरियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि गोल केला, मात्र भारताला मागे टाकता आले नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियासाठी जिहुन यांगने गोल केला, तर भारतासाठी जर्मनप्रीत सिंगनेही तिसरा गोल करण्यात वेळ वाया घालवला नाही. यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने या सामन्यातील दुसरा गोल केला, ज्यामुळे भारताने दक्षिण कोरियाविरुद्ध 4-1 अशी आघाडी घेतली.आतापर्यंत भारताने 39 सामने जिंकले असून दक्षिण कोरियाने 11 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, 12 सामने अनिर्णित राहिले
Edited by – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
