रोहित आणि कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी न होण्याबाबत जय शाह यांचे विधान

[ad_1]


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश न करण्याबाबत मौन सोडले आणि त्याबद्दल माहिती दिली. दुखापतीच्या जोखमीमुळे रोहित आणि कोहलीला या स्पर्धेत भाग घेण्याची सक्ती करू नये, असे जय शाह यांनी गुरुवारी सांगितले. 

 

देशांतर्गत हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार्स खेळताना दिसणार आहेत. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने सर्वोच्च भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते, परंतु जय शाह म्हणतात की कोहली आणि रोहितला या स्पर्धेत खेळण्याचा आग्रह केला गेला नाही जेणेकरून दुखापतीचा धोका टाळता येईल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वच आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेत नाहीत, असेही ते  म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जय शहा म्हणाले की, आम्ही कोहली आणि रोहितसारख्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळायला लावत नाही. असे केल्यास इजा होण्याचा धोका असू शकतो.पंत-गिल सारखे खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भाग घेणार  असून, नियमित कर्णधार रोहित आणि अनुभवी फलंदाज कोहली, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह देखील सहभागी होणार नाहीत. 

ऋषभ पंत आणि शुभमन गिल सारखे खेळाडू देखील दुलीप ट्रॉफीचा भाग असतील. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.

Edited by – Priya Dixit 

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading