श्रेयस अय्यर -सूर्यकुमार यादव सरफराज खानच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडून खेळणार

[ad_1]

Sarfaraz Khan,Indian Cricket

Sarfaraz Khan,Indian Cricket

टीम इंडियाचे सर्व वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. आता स्टार फलंदाज श्रेयस अय्यर बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. बुची बाबू या स्पर्धेसाठी हे खेळाडू सरफराज खानच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अजिंक्य रहाणेच्या जागी त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. कारण रहाणे सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. 

 

श्रेयस अय्यर तामिळनाडूमधील चार ठिकाणी सुरू होणाऱ्या आगामी बुची बाबू आमंत्रण स्पर्धेत मुंबईसाठी एका सामन्यासाठी उपलब्ध असेल.अय्यर 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान कोईम्बतूर येथे खेळल्या जाणाऱ्या मुंबईच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही या सामन्यात खेळणार आहे.  3 कसोटी सामने खेळलेल्या सरफराज खानकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अय्यर सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या केंद्रीय करार यादीतून बाहेर आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला त्याने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले.भारतीय संघाला आगामी काळात बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हैदराबाद, बंगाल, मुंबई, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, छत्तीसगड आणि गुजरात मधील संघ TNCA-11 आणि TNCA अध्यक्ष-11 सह बुची बाबू निमंत्रण स्पर्धेत सहभागी होतील. रेड बॉल फॉरमॅटमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा तिरुनेलवेली, कोईम्बतूर, सेलम आणि नाथम येथे आयोजित केली जाणार आहे . 

 

Edited by – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading