दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, कार ट्रकला धडकली; चार जणांचा मृत्यू

[ad_1]


राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे ऋषिकेशहून परतणाऱ्या एका कुटुंबाची कार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकला धडकली. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने त्याला एक किलोमीटरपर्यंत खेचले. त्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन कारला धडकला. अपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढून नेली. यानंतर 

 

हा अपघात एवढा भीषण होता की कारचे चक्काचूर झाले. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह चक्क अडकले होते. अशा स्थितीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

Edited by – Priya Dixit  

 

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading