[ad_1]

भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
रविवारी, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवत सात विकेट राखून विजय मिळवला. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 9 विकेट गमावत 161 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पावसाच्या हस्तक्षेपाला सामोरे जावे लागले. पहिल्या षटकातील केवळ तीन चेंडूंवर सामना थांबवण्यात आला. त्या वेळी भारताची धावसंख्या 6/0 होती आणि जैस्वाल-सॅमसन क्रीजवर उपस्थित होते. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी षटके कापली आणि भारतीय संघाला 78 धावांचे नवीन लक्ष्य मिळाले जे त्यांना आठ षटकांत गाठायचे होते. टीम इंडियाने 6.3 षटकात तीन विकेट गमावत 81 धावा केल्या आणि सामना सात विकेटने जिंकला.
Edited By- Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
