IND W vs SL W: श्रीलंकेने फायनलमध्ये भारताचा आठ गडी राखून पराभव करत आशिया कप विजेतेपद पटकावले

[ad_1]

mahila cricket
अंतिम फेरीत भारतीय महिला संघाचा सामना श्रीलंकेशी झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 

रविवारी महिला आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. यासह चमरी अटापट्टूच्या संघाने महिला आशिया कप जिंकला. यजमान संघाने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे.

 

रंगिरी डंबुला इंटरनॅशनल स्टेडियम, डंबुला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकांत 2 बाद 167 धावा केल्या आणि सामना जिंकला. भारत विक्रमी आठव्यांदा फायनल खेळायला आला होता. मात्र, गतविजेते विजेतेपद राखण्यात अपयशी ठरले.

 

स्मृती मंधानाच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 20 षटकात सहा विकेट गमावत 165 धावा केल्या. भारताकडून स्मृतीने 47 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या, मात्र इतर भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मंधानाने शानदार फलंदाजी करत भारताचा डाव आटोक्यात ठेवल्यामुळे संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. श्रीलंकेकडून कविष्का दिलहरीने दोन बळी घेतले.

Edited by – Priya Dixit  

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading