Pahalgam terror attack शरद पवारांनी देशवासीयांना राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले

[ad_1]


Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर देशवासीयांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून पहलगाममधील या भयानक हल्ल्यामुळे देश हादरला आहे, ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 

ALSO READ: पोलिसांनी कारवाई करत मुंबईतील सिमेंट कंपनीवर छापा टाकला, ४ किलो ड्रग्ज जप्त

मिळालेल्या माहितीनुसार पवार म्हणाले की, हा हल्ला कोणत्याही जाती किंवा धर्मावर हल्ला नव्हता, तर तो भारतावर हल्ला होता. जेव्हा भारतीयांवर हल्ला होतो तेव्हा संपूर्ण देशाने एकत्र उभे राहिले पाहिजे.

ALSO READ: पहलगाम हल्ल्याबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या भूमिकेचे केले कौतुक

ते म्हणाले की, अलिकडेच केंद्र सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. तसेच पवार म्हणाले की हल्ल्यानंतर त्यांनी काश्मीरमधील अनेक मित्र आणि सहकाऱ्यांशी बोलणे केले. तसेच पवार यांनी काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा केली.  

ALSO READ: बोलेरो आणि ट्रकची जोरदार टक्कर, भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading