सतपीरदर्गा हे फक्त एक निमित्त आहे, खरा हेतू वक्फ कायद्याविरुद्ध दंगली भडकवणे आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा खुलासा

[ad_1]


नाशिक मध्ये बेकायदेशीर सतपीर दर्गा हटवण्याचा मुद्द्यावरून नाशिक शहर तापले आहे.  यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, शहरात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करून हा कट उधळून लावला आहे. ते छत्रपती संभाजी नगर मध्ये बोलत होते. 

ALSO READ: महाराष्ट्रात शिक्षकांसाठी ड्रेस कोड असेल; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा
ते म्हणाले, नाशिकमधील हिंसाचार पूर्वनियोजित होता. या हिंसाचारात अतिक्रमण हटवणे आणि दंगली घडवण्याचा कट होता या मध्ये स्थानिक लोकांचा सहभाग होता. 

 

दोनच दिवसांपूर्वी, नाशिकमधील सतपीर दर्गा न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पाडली. पण त्याआधी, मध्यरात्री, 400 हून अधिक धार्मिक कट्टरपंथीयांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि जाळपोळ केली.

ALSO READ: नाशिक दर्गा पाडण्याच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत 31 पोलिस जखमी झाले होते, परंतु पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करून दंगल आटोक्यात आणली. AIMIM शहर अध्यक्ष मेहबूब शेख यांना अटक करण्यात आली आहे. अंदाजे 1,110 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

  

वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या उद्देशाने, समाजकंटकांना नाशिकमध्ये मोठी दंगल घडवायची होती. त्याने त्याची योजना पूर्ण केली होती.

ALSO READ: AIMIM चीफ मुख्तार शेख कोण? दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सतपीर दर्गा पाडण्याच्या बहाण्याने असामाजिक घटकांनी पोलिसांवर दगडफेक करून दंगल सुरू केली होती, परंतु पोलिसांनी वेळीच कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कट उधळून लावला.

Edited By – Priya Dixit  

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading