हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

[ad_1]


Maharashtra News : गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारने वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

ALSO READ: मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वीज दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील जनतेला त्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा दिलासा मिळेल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरापासून नवीन दर जाहीर केले आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, राज्यातील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील पाच वर्षांसाठी स्वस्त दरात वीज मिळेल.

ALSO READ: मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

१ एप्रिलपासून नवीन दर लागू होतील

साधारणपणे, महाराष्ट्रात विजेचे दर दरवर्षी सरासरी ९ टक्के दराने वाढतात. परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) ने पहिल्यांदाच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. वीज दर कमी करण्याच्या उद्देशाने सरकारनेही यावर सहमती दर्शविली आहे. सरकारकडून संमती मिळाल्यानंतर, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा नवीन दर जाहीर केले. नवीन वीजदर १ एप्रिलपासून लागू होतील. वीजदरातील कपातीमुळे विशेषतः घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळेल.  

ALSO READ: कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading