भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला

[ad_1]

Team India
भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानचा संघ 49.4 षटकांत 241धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताने 42.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक झळकावले.

ALSO READ: IND vs PAK: विराट पाकिस्तानविरुद्ध पाचव्यांदा ठरला सामनावीर
शाहीन एकामागून एक वाईड गोलंदाजी करत होता. 43 व्या षटकात भारताला विजयासाठी चार धावांची आवश्यकता होती आणि कोहलीला शतक करण्यासाठी पाच धावांची आवश्यकता होती. ४३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने एक धाव घेतली. मग पुढच्याच चेंडूवर अक्षरने एक धाव घेतली. विराटने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला

ALSO READ: विराट कोहलीच्या ५१ व्या शतकामुळे भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सनी हरवले

भारताने आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन सामने जिंकले आहेत आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून जवळजवळ बाहेर पडला आहे. आता त्याला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

ALSO READ: RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर चौथा विजय
भारताचे दोन सामन्यांनंतर चार गुण आहेत, तर पाकिस्तानला दोन सामन्यांमध्ये खाते उघडता आलेले नाही. आता पाकिस्तानचा एकमेव सामना बांगलादेशविरुद्ध आहे. तर, सोमवारी न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होईल. जर किवी संघाने हा सामना जिंकला तर बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघ बाहेर पडतील.

 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading