दहावीच्या पेपरफुटीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले मोठे विधान

[ad_1]


राज्यात 21 फेब्रुवारी पासून 10 वी चे पेपर सुरु झाले आहे. शुक्रवारी पेपरच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेचा पेपर जालना आणि यवतमाळच्या परीक्षा केंद्रावर फुटला या वर प्रशासनाकडून परीक्षा आयोजित करण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पालकांकडून परीक्षा प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मोठे विधान दिले आहे. 

ALSO READ: दहावीच्या मराठी पेपरफुटी प्रकरणात प्रश्नपत्रिका हाताने लिहिल्याचा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा दावा
ते म्हणाले, प्राथमिक स्तरावर, विशेषतः हस्तलिखित स्वरूपात, अनियमितता आढळून आली आहे. त्यांनी आश्वासन दिले की सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भुसे म्हणाले की, कॉपी-फ्री परीक्षा मोहिमेची तयारी सुमारे दीड महिन्यांपासून सुरू होती. त्यांनी दावा केला की मुख्य सचिवांनी विभाग प्रमुखांसोबत बैठका घेतल्या आहेत आणि जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठका घेण्यात आल्या आहे. 

ALSO READ: यवतमाळमध्ये दहावीचा मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल, केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल
ज्या परीक्षा केंद्रावर अशा घटना घडतील तिथल्या जबाबदार लोकांवर कारवाई करण्यात येईल. एक रेकॉर्ड राखला जाईल आणि भविष्यात अशा परीक्षा केंद्रांना रद्द करण्यात येईल. जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल. आपण नक्कीच सुधारणा करू. अशा ठिकाणी पोलीस व्यवस्था वाढवण्यात येईल. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक धोरणे अवलंबण्याचे निर्देश दिले जातील. सरकारने घडलेल्या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि अशा सर्व ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.

Edited By – Priya Dixit

 

ALSO READ: जालन्यात दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर लीक झाला

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading