स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्जच्या जोरावर भारताने रचला इतिहास

[ad_1]


भारतीय महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आयर्लंडसमोर 370 धावांचा डोंगर उभा केला. स्मृती मानधना, हरलीन देओल आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी भारताकडून दमदार फलंदाजी केली. 

 

भारताकडून कर्णधार स्मृती मंधानाआणि प्रितिका रावल सलामीला आल्या. या दोन खेळाडूंनी संघासाठी 156 धावांची भागीदारी केली आणि त्यांनी भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. मंधानाने 73 आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलने अर्धशतक झळकावले. तर जेमिमाह रॉड्रिग्जने दमदार शतक केले. जेमिमाने केवळ 91 चेंडूत 12 चौकार मारत 102 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय महिला संघाला 370 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. 

 

370 धावा ही भारतीय महिला संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये भारताने आयर्लंडविरुद्ध वनडे सामन्यात 358 धावा केल्या होत्या. तर 2024 मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 358 धावा केल्या होत्या. जी त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या होती. पण स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्या दमदार खेळीमुळे भारताने आता हा विक्रम मागे टाकला आहे. 

जेमिमाह रॉड्रिग्जने 2018 साली वनडेमध्ये पदार्पण केले. आता त्याने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. तिने टीम इंडियासाठी आतापर्यंत 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने तिच्या बॅटने 1089 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading