Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

[ad_1]

Bharat Mata Temple

भारतात अनेक प्रसिद्ध आणि अद्वितीय अद्भुत अद्भुत मंदिरे आहे जिथे पर्यटकांची गर्दी असते. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एक मंदिर आहे जिथे भारतमातेची पूजा केली जाते. येत्या काही दिवसांत प्रजासत्ताक दिन येत आहे. तसेच तुम्ही देखील या  प्रजासत्ताक दिनाला या मंदिर नक्की भेट देऊ शकतात. 

 

भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे जे आज देखील इतिहासाची साक्ष देतात. तसेच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये असलेले ह्या मंदिरात भारतमातेची पूजा केली जाते. हे एकमेव मंदिर आहे जिथे भारत मातेची सुंदर अशी पूजा केली जाते. तसेच हे मंदिर प्राचीन असून या मंदिराची भव्यता आणि प्राचीनता पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात. तसेच येथे भारताच्या नकाशाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. हे मंदिर खूप पवित्र मानले जाते. 

 

भारत माता मंदिर इतिहास- 

तसेच या मंदिराची पायाभरणी भारतरत्न डॉ. भगवान दास यांनी 2 एप्रिल 1926 रोजी केली होती. काशीचे दुर्गा प्रसाद हे मंदिर बांधण्यास सहमत झाले. भारत मातेचे हे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठ परिसरात आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागली. तसेच 25 ऑक्टोबर 1936 रोजी वाराणसी येथे महात्मा गांधींनी त्याचे उद्घाटन केले. येथे भारतमातेच्या अविभाजित नकाशाची पूजा केली जाते. हे भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. यामध्ये अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, बर्मा आणि श्रीलंका या देशांचे शिल्प मकराना दगडावर कोरले आहे.  तसेच भारत मातेच्या या नकाशात, सध्याच्या शहरांची, तीर्थस्थळांची आणि प्रांतांची नावे तसेच पर्वत, टेकड्या, तलाव, कालवे आणि बेटे स्पष्टपणे दर्शविली आहे. येथे, उत्तरेला पामीर, तिबेट, तुर्किस्तान, पूर्वेला ब्रह्मदेश, मलय द्वीपकल्प, चीनची भिंत, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचे सुंदर चित्रण केले आहे. या मंदिराच्या दारावर राष्ट्रगीत मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे.

 

अखंड भारतमातेचे हे मंदिर वर्षातून दोनदा सुंदरपणे सजवले जाते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी ते एका खास पद्धतीने सजवले जाते. या नकाशात समुद्राचा परिसर पाण्याने भरलेला दाखवला आहे. तसेच सपाट भाग गवत आणि फुलांनी सजवलेला आहे. ते दिसायला खूप खास दिसते. 

 

भारत माता मंदिर वाराणसी जावे कसे? 

वाराणसी मध्ये असलेले भारत मातेचे हे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठ परिसरात असून येथे पोहचणे सोपे आहे. तसेच वाराणसी हे शहर अनेक महामार्ग आणि रेल्वे मार्गांना जोडलेले आहे. त्यामुळे खासगी वाहन किंवा कॅप, बसच्या मदतीने इथपर्यंत सहज पोहचता येते. 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading