तिरुपती चेंगराचेंगरी प्रकरण : आंध्र प्रदेश सरकारची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत

[ad_1]


Tirupati stampede case: आंध्र प्रदेश सरकारने गुरुवारी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तिरुपती येथील एमजीएम शाळेजवळील बैरागी पट्टेडा येथे बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 जण जखमी झाले. 

ALSO READ: विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आढळले दोन मृतदेह, पाहून सर्वजण थरथर कापले

मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री ए सत्य प्रसाद म्हणाले की, मृत भाविकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्री गटाच्या भेटीचा भाग म्हणून पीडित कुटुंबांना भेटल्यानंतर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांची घोषणा केली आहे. तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू लवकरच येतील आणि सर्व जखमींशी बोलतील आणि त्यानंतर जखमींना किती नुकसानभरपाई द्यायची याचा निर्णय घेतील. असे सांगितले जात आहे की शेकडो भाविक भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात आले होते. वैकुंठ द्वार दर्शनमसाठी तिरुमला टेकड्यांवर तिकिटांसाठी ते धावपळ करत होते. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनमसाठी देशभरातून शेकडो भाविक आले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading