IND vs AUS: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला

[ad_1]


ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले असून सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या आणि 157 धावांची आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव 175 धावांवर संपला आणि रोहित आणि कंपनीने 18 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने 19धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. उस्मान ख्वाजा नऊ धावांवर नाबाद राहिला आणि मॅकस्विनी 10 धावांवर नाबाद राहिला. मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिली कसोटी295 धावांनी जिंकली होती. 

 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या होत्या. शुक्रवारी उस्मान ख्वाजाला बुमराहने बाद केले. शनिवारी कांगारूंनी एका विकेटवर 86 धावांवर खेळ सुरू केला आणि शेवटच्या नऊ विकेट गमावून 251 धावा केल्या.भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. बुमराह आणि सिराजशिवाय नितीश रेड्डी आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांवरच आटोपला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही भागीदारी तोडली.

Edited By – Priya Dixit 

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading