नागपुरात भीषण रस्ता अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

[ad_1]


नागपुरात नरेंद्र नगर उड्डाणपुलावर बुधवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून त्यात दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आदर्श समर्थ आणि आदित्य मेश्राम असे या तरुणाची नावे आहेत. 

बेदरकारपणे वाहन चालवल्याने आणि सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील नरेंद्र नगर उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. 

 हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या दोन्ही तरुणांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते सुमारे 50 मीटर रस्त्यावर घसरले, त्यामुळे दुचाकी दुभाजकावर आदळली.

हेल्मेट घालण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी नागपूर वाहतूक पोलीस मोहीम राबवत असताना ही घटना घडली आहे. दुर्दैवाने, हा अपघात शहरातील रस्ते अपघातांच्या मालिकेचा एक भाग आहे ज्यात अवघ्या 24 तासांत दोन ज्येष्ठ नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ आणि मेश्राम हे मित्र अर्जुन विश्वकर्मासोबत रात्री उशिरा मौजमजेसाठी बाहेर पडले होते. समर्थ आणि मेश्राम दुचाकीवर होते, तर विश्वकर्मा त्यांच्या स्कूटरवरून त्यांच्या मागे जात होते. हा ग्रुप कोकाकोला कंपनीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. उड्डाणपुलावर पोहोचल्यावर समर्थने बाईकचा वेग वाढवला आणि त्यामुळे दुभाजकाला धडक बसून अपघात घडला. जखमींना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. 

Edited By – Priya  Dixit

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading